( नवी दिल्ली )
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकान्यांना निवडणुकीनंतर ४५ दिवसांत निवडणूक प्रक्रियेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज, वेबकास्टिंग आणि व्हिडीओ फुटेज नष्ट करण्यात यावेत, असे आदेश दिल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी संताप व्यक्त केला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या आदेशावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली.
राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. त्यांनी निवडणुकीवर मंच फिक्सिंगचा आरोप केला. ते म्हणाले की, वोटर लिस्ट, मशीन रीडेबल फॉर्मेट देणार नाही. सीसीटीव्ही फुटेज आता कायदा बनवून लपवणार. निवडणुकीच फोटो-व्हिडीओ आता १ वर्ष नाही, तर ४५ दिवसांत नष्ट करणार. ज्यांच्याकडून उत्तरे पाहिजेत तेच पुरावे नष्ट करत आहेत. त्यामुळे स्पष्ट दिसते की, ही मॅच फिक्सिंग आहे आणि फिक्स केलेली निवडणूक ही लोकशाहीसाठी विष आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
राहुल गांधीच्या आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगानेही पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक झाले तर सर्वसामान्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन होईल. सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक केले तर कोणी मतदान केले आणि कोणी केले नाही ते समजेल. यामुळे नागरिकांवर दबाव आणला जाऊ शकतो. त्यांच्याशी भेदभाव केला जाऊ शकतो. असामाजिक घटक त्यांना धमकावू शकतात. सीसीटीवी फुटेज शेअर केल्यास कोणताही गट किंवा व्यक्ती मतदारांना सहजपणे ओळखू शकते. यामुळे मतदान करणारे आणि न करणारे या ताजा सहकाकडून दबाव, भेदभाव आणि बाजीचा धोका वाढेल. दुसरी गोष्ट म्हणजे असे केल्याने लोकप्रतिनिधी कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होईल. तिसरे म्हणजे हे व्हिडीओ केवळ अंतर्गत देखरेखीसाठी आहेत. ते केवळ न्यायालयाच्या आदेशानुसारच दिले जाऊ शकतात, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.