(रत्नागिरी)
महाराष्ट्र ज्ञानपीठ सामान्य ज्ञान परीक्षा २०२४ मध्ये रत्नागिरी येथील कृष्णाजी चिंतामण आगाशे शाळेचा कु.मल्हार अलंकार साळवी राज्यात पहिला आला आहे. इयत्ता पहिली मध्ये शिकणारा कु. मल्हार याने या परीक्षेमध्ये उत्तुंग अशी कामगिरी करून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये रत्नागिरी येथे सदरची परीक्षा घेण्यात आली होती. त्याच्या या यशाबद्धल शाळेच्या मुख्याध्यपिका सौ. कदम मॅडम, शाळा समितीचे प्रमुख श्री हातखंबकर सर, वर्गशिक्षिका सौ. हातखंबकर मॅडम तसेच सर्व शिक्षक वर्गातर्फे त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.