(देवरूख / सुरेश सप्रे)
देवरूख जवळील कर्ली गावातील सामाजिक कार्यकर्ते मोहन चाळके यांचे काल हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे अंत्यविधीला येणारी मुलगी, जावई, नातू याचेसह येणारे नातेवाईक यांचे गाडीला जगबुडी नदीत पडून झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मोहन चाळके यांची कन्या व नातू यांचेही अपघात निधन झालेने कर्ली गावावर शोककळा पसरली आहे
याबाबतचे वृत्त असे की, 19/05/2025 रोजी पहाटे 5.00 ते 5.30 वा चे दरम्याने चार चाकी ( kia carens 7 सीटर ) गाडी क्रमांक MH 02 fx 3265 ही भरणे येथील जगबुडी पुलावरून खाली पडून अपघात झाला आहे. सदर गाडीमध्ये सात प्रवासी असून झालेल्या अपघातात विवेक श्रीराम मोरे ( वय 47 वर्ष राहणार- एफ 104 इंद्रप्रस्थ बिल्डिंग पुनम विहार कॉम्प्लेक्स आयपा मंदिराच्या पाठीमागे मिरारोड जिल्हा ठाणे) हे सुखरूप असून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मिरा रोड येथून दिनांक 18/05/2025 रोजी 11.30 वा चे सुमारास सदर गाडीमध्ये एकूण सात जण त्यापैकी 1) विवेक श्रीराम मोरे ( सुखरूप) 2) परमेश पराडकर, ( चालक) (जखमी) 3) मेघा परमेश पराडकर ( मयत) 4) सौरव परमेश पराडकर ( मयत ) 5) मिताली विवेक मोरे, वय 45 वर्ष ( मयत) 6) निहार विवेक मोरे, वय 19 वर्ष ( मयत) 7) श्रेयस राजेंद्र सावंत, वय 25 वर्ष ( मयत ) असे सर्वजण विवेक श्रीराम मोरे यांचे सासरे मोहन काशीराम चाळके राहणार कर्ली- देवरुख तालुका देवरुख जिल्हा रत्नागिरी हे मयत झाले असल्याने त्यांचे अंत्यविधी करिता जात असताना पहाटे 05.00 ते 5.30 वा चे दरम्याने भरणे येथील जगबुडी नदीचे पुलाचे कठड्याला ठोकर देऊन सदर गाडी पुलावरून खाली पडून अपघात झाला.
अपघाताची खबर मिळताच खेड पोलीस व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत केली.