( रत्नागिरी )
प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या महिलेला रत्नागिरी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. तिच्याविरुद्ध २२ डिसेंबर २०१९ रोजी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. जवळपास पाच वर्षांच्या तुरुंगवासानंतर, न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिची मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने दिलेल्या अटींनुसार, संबंधित महिलेला खटल्याच्या प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे, तसेच प्रत्येक महिन्याच्या १ व १५ तारखेला जयगड पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक आहे. हा निर्णय सत्र न्यायाधीश श्री. सुनील गोसावी यांनी दिला.