( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी MIDC परिसरातील काही रस्त्यांवर उभे करण्यात आलेले विद्युत पोल असूनही त्यावर दिवे बंद असल्याचे चित्र पाहायचं मिळत आहे. त्यामुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळी रोजंदारीवर काम करणारे मजूर, रहिवासी यांना रात्रीच्या वेळी अंधारात वाट चोखाळावी लागत आहे.
विशेषतः उद्योगधंद्यांचा केंद्रबिंदू असलेल्या या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावर प्रकाशव्यवस्था अत्यंत गरजेची आहे. मात्र काही रस्त्यांवर विद्युत पोल उभारले गेले असले, तरी त्यावर असणारे लाईट ही बंद अवस्थेत आहेत. याच भागात रात्रीच्या अंधारात भर रस्त्यांवर गुरांचा ताफा बसलेला असतो. परिणामी, रात्रीच्या वेळी अंधारात वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे.
तसेच येथील कंपन्यांमधून परराज्यातील मजूर मोठ्या संख्येने काम करत असल्याने ते रात्रीच्या सुमारास आपले काम आटपून बाहेर पडतात. नागरिकांना ये- जा करण्यास असुरक्षित वाटू नये यासाठी संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन MIDC परिसरात प्रत्येक पोलवर लाईट बसवून योग्य प्रकाशव्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.