(रत्नागिरी)
भारतीय सैन्य दलाच्या मनोबलासाठी रविवार दिनांक ११ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ या मार्गावर “तिरंगा रॅली” आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही रॅली रद्द करण्याचा निर्णय सुरक्षितता व राष्ट्रीय हित लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने घेतलेला असेल आणि नागरिकांच्या जमावला धोका निर्माण होईल अशी भावना धरून प्रशासनाने घेतलेला असेल तर प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे चालू असलेल्या कृषीप्रदर्शन आणि आजच्या बसस्थानक लोकार्पण सोहोळ्यालाही तो नियम लागू करून प्रशासनाने हे सोहोळेही रद्द करावेत अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणुन करतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष अॅड देवेंद्र बंटी वणजू यांनी केले आहे.
जनतेला वेगळा न्याय आणि कार्यक्रमाला वेगळा न्याय हि नेमकी भानगड काय हे शोधण्याची हि खरी वेळ आहे, अशीही टीका अॅड बंटी वणजू यांनी केली आहे. मी कायम जनतेच्या मनातील बोलतो आणि सरकारमध्ये असलो तरी जनतेच्या बाजूनेच बोलत राहणार आहे. कुणीही जनतेला गृहीत धरू नये प्रशासन नक्की काय करतय याचे आत्मपरीक्षण आता प्रशासनाने करणे गरजेचे आहे असेही प्रतिपादन तालुकध्यक्ष अॅड देवेंद्र बंटी सदानंद वणजू यांनी केले आहे.