(मुंबई)
आगामी पावसाळ्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांचे मॉन्सून विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक १५ जूनपासून २० ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही काही गाड्यांच्या प्रस्थान वेळांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.
दरड कोसळणे, रुळांवर पाणी साचणे अशा घटनांचा संभाव्य धोका लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने गाड्यांचे वेळापत्रक सुस्थितीत ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. या नव्या वेळापत्रकानुसार अनेक प्रमुख गाड्यांच्या प्रस्थान वेळांमध्ये लक्षणीय बदल करण्यात आले आहेत.
महत्त्वाचे वेळबदल पुढीलप्रमाणे –
मडगाव – मंगळुरू सेंट्रल एक्स्प्रेस आता 4.00 ऐवजी 4.40 वाजता सुटणार
रत्नागिरी – दिवा ट्रेन 5.35 ऐवजी 5.40 वाजता रवाना होणार
तिरुअनंतपुरम – एलटीटी एक्स्प्रेस 9.10 ऐवजी 7.45 वाजता निघणार
मडगाव – ह. निजामुद्दीन एक्स्प्रेस 10.00 ऐवजी 8.00 वाजता प्रस्थान करणार
मडगाव – सीएसएमटी एक्स्प्रेस 9.15 ऐवजी 8.30 वाजता रवाना होणार
सावंतवाडी रोड – दिवा सेवा 8.25 ऐवजी 8.40 वाजता
मडगाव – एलटीटी ट्रेन 12.30 ऐवजी 11.30 वाजता
मडगाव – सीएसएमटी 3.05 ऐवजी 12.00 वाजता
मडगाव – वंदे भारत एक्स्प्रेस 2.40 ऐवजी 12.20 वाजता
करमाळी – एलटीटी 2.10 ऐवजी 1.40 वाजता
मडगाव – मंगळुरू सेंट्रल पॅसेंजर 2.10 ऐवजी 2.15 वाजता
मंगळुरू जंक्शन – मुंबई ट्रेन 2.00 ऐवजी 4.35 वाजता
मडगाव – मंगळुरू वंदे भारत 6.10 ऐवजी 5.35 वाजता
सावंतवाडी रोड – दादर ट्रेन 8.00 ऐवजी 5.55 वाजता
मडगाव – सीएसएमटी 7.00 ऐवजी 6.00 वाजता
सावंतवाडी रोड – मडगाव गाडी 6.35 ऐवजी 6.50 वाजता प्रस्थान करेल.
प्रवाशांनी या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी व नियोजन करताना काळजी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाळ्यातील संभाव्य अडथळ्यांवर मात करत सुरक्षित आणि वेळेवर सेवा पुरवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.