(विशेष प्रतिनिधी)
गेल्या एक महिन्याहून अधिक काळ खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आपल्या मागण्यांसाठी दिवस- रात्र ठिय्या मांडून बसलेल्या वैभवी पाटणे यांनी दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांना खरमरत शब्दात पत्र लिहिले आहे. या पत्रातून तालुका प्रशासनातील अधिकारी एखाद्या आंदोलनकर्त्या महिलेशी कशापद्धतीने वागत आहे याचा ऊहापोह केला आहे.
वैभवी पाटणे यांच्या वडिलांनी बांधलेली मिर्ले गावातील देवळाची कमानी बेकदायदेशीर ठरवून प्रशासनाने पाडली. मात्र अतिक्रमण आता प्रशासन करत असल्याचा आरोप वैभवी पाटणे यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात आंदोलनकर्त्या पाटणे यांनी त्यांच्याबाबत आंदोलनादरम्यान काय काय घडले याचे भीषण वास्तव सडेतोड मांडून प्रशासनातील अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा समोर आणला आहे.
आंदोलनकर्त्या लाडक्या बहिणीची प्रशासनातील अधिकारी साधी विचारपूस करत नसतील तर ही लोकशाही मूल्यांची अवहेलना नव्हे काय? जनतेच्या मागण्या ऐकून घेणे व योग्य तो प्रतिसाद देणे ही प्रशासनाची जबाबदारी असते. याच तालुक्यातील आमदार योगेश कदम हे गृह (शहर) ‘राज्यमंत्री’ आहेत. तर या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे देखील मंत्रिमंडळातील चार नंबरचे मंत्री आहेत. मात्र या लाडक्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी मंत्रीमहोदय देखील दुर्लक्ष करत आहेत का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
आंदोलनकर्त्या वैभवी पाटणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेले पत्र जसेच्या तसे….
प्रति,
जिल्हाधिकारी साहेब
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय
रत्नागिरी
विषय: खेड तहसिलदार कार्यालयाच्या आवारात ३६ दिवस ठिय्या आंदोलनाला बसले आहे प्रशासनाने साधी दखल घेतली नसल्यामुळे दि ०१/०५/२०२५ रोजी महाराष्ट्र दिनी आमरण उपोषणाला बसत असल्याबाबत..
महोदय,
मी वैभवी विजय पाटणे मु पो खोपी (तांबडवाडी) ता खेड जि रत्नागिरी असुन मी दि १८/०३/२०२५ पासुन खेड तहसिलदार कार्यालयाच्या आवारात मिर्ले गावातील शासकिय जमिनीवर विनापरवानगी अतिक्रमण व देवरहाटीतील विनापरवानगी वृक्ष तोड करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी ठिय्या आंदोलन सुरु केले परंतु केलेल्या मागण्याबाबत माझ्याशी चर्चा किंवा माझी साधी विचारपुस किंवा माझ्या संरक्षणासाठी पोलीस शिपाई किंवा माझ्या नैसर्गीक विधीसाठी बाथरुम सुध्दा उघडे ठेवले नाही. मी ठिय्या आंदोलनाला बसले आहे. तरी आवारातील लाईट रात्री बंद ठेवायचे कार्यालयातील कर्मचारी जाणूनबुजून मी बसलेल्या ठिकाणी गाडी पार्क करायचे मी विचारले तर आम्ही कार्यालयातील आहोत आम्ही गाडी कुठे लावायची असे दम देयाचे. मी महिला असल्यामुळे व मी एकटी असल्यामुळे यांनी खुप त्रास मला दिला आजतागायत प्रशासनातील कोणीही आले नाही व मी महिला असल्यामुळे माझी साधी दखल घेतली नाही.
माझी नवसाची कमानी तोडू नका म्हणून गावच्या पातळीवर मी अर्ज केले त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मिटिंग लावली मिलें ग्रामपंचायतीमध्ये त्यामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष नव्हते ते माझ्याशी फक्त फोन वर बोलले त्यामध्ये त्यांनी माझ्याकडे परवानगी मागीतली म्हणून मी उलटी त्यांच्याकडे तोडकामासाठी परवानगी मागीतली त्यावर त्यांनी मला उद्धटपणे उत्तर दिले कि तुला काय हव ते कर आम्हाला काय पाहिजे ते करु म्हणून मि तुमच्याकडे सातबारा फेरफार ८ अ आणि अर्ज घेऊन आले तो तुमच्या कार्यालयात दिला त्यानंतर तोच अर्ज खेड तहसिलदारांना दिला. तहसिलदारांनी १ ते १२ जणांना नोटिस काढण्यात यावी असा आदेश दिला. तरी नोटिसा काय काढली नाही त्यानंतर मी सतत तहसिलदारांकडे कमानी वाचवा कमानी वाचवा म्हणून फेऱ्या मारत होते. म्हणून तहसिलदारांनी ३०/१२/२०२४ ला सुनावणी लावली आणि आदेश दिला. तरीही त्यांचं त्या जागी अदला बदल करणे चालूच होते. म्हणून मी २६/१२/२०२४ च्या अर्जानुसार २६ जानेवारीला उपोषणाला मिर्ले गावात बसले तेव्हा माझ्या मागण्या होत्या की, १३ जणांवर न्यायानयीन फौजदारी गुन्हे दाखल करा, मुर्त्या मुळ जागी ठेवा आणि शासकिय परवानग्या घेऊनच जिर्णोध्दार करावा. मी ११ दिवस उपोषण शांततेत चालले होते. ११ व्या दिवशी तिसंगी प्राथमिक दवाखान्यांचा खोटा रिपोर्ट दाखवून मला जोर जबरदस्तीने खेड पोलिस स्टेशनच्या पाच महिला पोलिसांनी २० मिटर पर्यंत फरफटत नेऊन नखाने ओरबडून माझ्या अंगावर जखमा करुन रक्तबंबाळ केले. माझ्या अंगावरची साडी सोडून माझा परकर वर करुन मला अंबुलन्सच्या डायव्हर व शिपाई या पुरुषांसमोर बेईज्जत करुन ॲम्बुलन्समध्ये कोंबले, मला कळबंणी हॉस्पीटलमध्ये नेऊन टाकले अशा प्रकारे माझ उपोषण चिरडण्यात आले.
मिर्ले गावातील देवरहाटी व देऊळ हे शासकिय जमिनीत असताना शासनाकडून देऊळ जिर्णोध्दार करताना लेखी परवानगी घेतली का? याची माहिती माहितीच्या अधिकारात घेतली असता, कोणतीही शासकिय परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मि सामान्य महिला आहे. म्हणून तुम्ही माझ्या नवसाच्या कमानीची परवानगी मागताय आणि तुम्ही तर गावाला खोट सांगून बेकायदेशीर तोडकाम करताय याबाबत मी खेड तहसिलदार खेड प्रांतकार्यालय जिल्हाधीकारी कार्यालय व सर्व ठिकाणी पत्र व्यवहार केला.
गावात देवीचे देऊळ बांधतायत आणि हे चांगल काम संपूर्ण गावाला विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे कि दादागीरीने हे कायदयाचे राज्य आहे. याच भान या लोकांना नाही हे लोक गायगरीबाला कवडीची किमत देत नाही जरा यांच्या विरोधात गेला कि त्याला वाळीत टाकणे त्याला दंड लावणे असे अमानूष काम हे गावगुंड करत आहेत. माझा लढा देव व देऊळ बांधतात याच्या विरुध्द नसून या गावगुंडाविरोधात आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गिरीश गमरे यांच्याजवळ माझी सर्व व्यथा सांगितली. ते मिर्ले गावात चौकशी व तेथे होत असलेल्या वनविभागाच्या पंचनाम्याची माहिती घेण्यासाठी गेले असता त्यांना शिविगाळ मारहाण करण्यात आली. व त्यांच्यावर खंडणी मागितली असा खोटा गुन्हा दाखल केला. त्या प्राणघातक हल्ल्याची व्हिडीओ क्लिप काढून व्हायरल करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. पण वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गिरीश गमरे हे अनुसुचित जातीचे आहेत हे माहिती असताना त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. माझ्यावर अन्याय झाल्याचे पुरावे दाखल केले असताना या गावगुडांवर गुन्हे दाखल केले नाहीत.
या गावगुंडांनी माझ घर वाळीत टाकल आहे. माझ्या चुलत्यांच रोजीरोटीचे साधन छोटस दुकान आहे. त्या दुकानात कोणी गावातील गेल तर त्यांना १००००/-रु दंड लावण्यात आला आहे. माझे चुलते संतोष पाटणे यांनाही वाळीत टाकण्यात आल आहे. मला सहकार्य करणाऱ्यांना मारहाण करत आहेत त्या मारहाणीचे व्हिडीओ क्लिप व्हायरल करुन दहशत माजवण्याचे काम मोठ्या प्रमाणात करत आहे. मला सहकार्य करणाऱ्यांना त्रास देत आहेत. आज माझ्या कुटूबांतील सर्व सदस्य दहशतीच्या छायेखाली व या लोकांच्या कडून श्रध्देच्या नावाखाली कोणताही घातपाताची शक्यतेने त्रस्त आहेत.
दि ०१/०४/२०२५ रोजीचे मा. तेजस्वीनी पाटिल तहसिलदार (महसूल) जिल्हाधिकार कार्यालय रत्नागिरी यांच्या तहसिलदार खेड यांना पाठविलेल्या पत्राची प्रत मला मिळाली. त्यात स्पष्ट उल्लेख आहे कि, शासकिय जागेवर अतिक्रमण असुन त्वरीत कारवाही करून मला कळवाचे. असे लेखी पत्र दिले आहे तरी तहसिलदार खेड कारवाई का करत नाहीत हे विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव व महासचिव नितीन जाधव गेले असता त्यांना खेड तहसिलदार यांनी उडवाउडवीची उत्तरे देत असभ्य वर्तन करत तुम्ही कोर्टात जा मी काहीही करणार नाही तुम्ही मला शिकवायच नाही मी काय करायचे अशी उत्तरे त्यांना देण्यात आली त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्षावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर व शिवीगाळ करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा. विना परवानगी शासकिय जागेत अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. वनविभागाच्या दंडात्मक कारवाही झाल्याचे पत्र आहे त्यामुळे देवरहाटीतील वृक्षतोड झाली हे सिध्द झाले त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझ्या कमानीचा जिर्णोध्दार झाला पाहिजे माझी मानहानी माझी बेआब्रू करुन मला ना#×$उ#व% करत फरफटत पाच महिला पोलिसांनी व त्यांना आदेश देणारे पोलिस निरिक्षक भोईर व खेड तहसिलदार सुधिर सोनवणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे सक्षम अधिकाऱ्यांच्या सहिचे पत्र लवकर न मिळाल्यास दि ०१/०५/२०२५ रोजी महाराष्ट्र दिनापासून खेड तहसिलदार कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणाला बसत आहे.
ठिय्या आंदोलन चालू आहेच परंतु या आमरण उपोषणा दरम्यान माझे काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी साहेब आपली राहील याची नोंद घ्यावी हि नम्र विनंती!
कळावे,
दिनांक २५/०५/२०२५
(वैभवी विजय पाटणे)