(मुंबई)
आगामी शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत ‘पुनर्परीक्षा’चा कोणताही उल्लेख केला जाणार नाही.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (एनईपी 2020) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या यूजीसी नियमन २०२५ (पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यासाठी किमान शिक्षण मानके) ची राजपत्र अधिसूचना जारी होताच देशातील सर्व विद्यापीठांमध्ये हे नियमन सक्तीने लागू करण्यात आले आहे. या नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांना अधिक लवचिकता मिळणार असून, प्रवेश प्रक्रिया, पदवी पूर्ण करण्याचा कालावधी आणि मूल्यांकनाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत.
नवे बदल पुढीलप्रमाणे:
-
आता विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा प्रवेश (multiple entry) आणि निर्गमन (exit) पर्याय उपलब्ध असेल.
-
पदवी पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी वाढवण्यात आला आहे.
-
अनुत्तीर्ण असे कोणतेही नोंदवहन गुणपत्रिकेत राहणार नाही.
-
तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चार वर्षांत, तर चार वर्षांचा अभ्यासक्रम पाच वर्षांत पूर्ण करण्याची संधी दिली जाणार आहे.
यूजीसी नियमन २०२५ नुसार, पुढील वर्षापासून (२०२५ पासून) विद्यार्थी बारावी पूर्ण केल्यानंतर कोणत्याही विद्याशाखेत पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतील. यात कला, वाणिज्य किंवा विज्ञान विषयातील पदवी अभ्यासक्रमासाठी बारावीमध्ये त्या विशिष्ट विषयाचे शिक्षण घेतलेले असणे बंधनकारक राहणार नाही. विद्यार्थी CUET UG 2025 परीक्षेत किंवा संबंधित विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेत बसून त्यांच्या गुणवत्तेनुसार आवडती शाखा निवडू शकतील.
२०२५ च्या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी पूर्ण होण्याची तारीख निवडण्याचा पर्यायही दिला जाईल, जो त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रातील कामगिरीच्या मूल्यमापनावर आधारित असेल. याशिवाय, १०% जागा विशेष मेरिट (ADP – Advanced Diploma Programme) विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत आणि दीक्षांत समारंभापूर्वी त्यांना पदव्या प्रदान केल्या जातील.
आतापर्यंत, दोन किंवा तीन विषयांत नापास झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत ‘पुनर्परीक्षा’चा उल्लेख होत असे. मात्र, आता अशा कोणत्याही नोंदीचा समावेश केला जाणार नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण कमी होईल आणि शैक्षणिक प्रवास अधिक सकारात्मक बनेल.