(मुंबई)
पुढील तीन महिन्यांत जगभरातील तापमानात अधिक तीव्र वाढ होणार असल्याचा इशारा जागतिक हवामानशास्त्र संघटनेने (WMO) दिला आहे. उत्तर-दक्षिण प्रशांत महासागर, पूर्व आशिया आणि अरब देशांमध्ये उष्णतेने उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तवली आहे.
मे ते जुलै २०२५ या कालावधीत जगातील बहुतांश भागांमध्ये पाऱ्याचा पारा चढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ आणि अभ्यासक या वाढत्या तापमानामुळे अधिक चिंतेत आहेत. उष्णतेचे दुष्परिणाम मानवी आरोग्य, शेती आणि पर्यावरणावरही स्पष्टपणे दिसून येत आहेत. दिवसेंदिवस विविध भागांत तापमानाचे उच्चांक नोंदवले जात आहेत.
भारतावरील परिणाम
भारताच्या काही भागांमध्ये मे ते जुलै दरम्यान तापमान सर्वसाधारणपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेची तीव्रता असह्य होऊ शकते. तसेच, पावसाच्या वेळापत्रकातही बदल होण्याचा अंदाज आहे. या कालावधीत काही भागांत सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता जागतिक हवामानशास्त्र संघटनेने वर्तवली आहे.
तापमानवाढीमुळे होणारे धोके
- पूर, चक्रीवादळे, वणवे आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती अधिक तीव्र आणि वारंवार घडू शकतात.
- शेती उत्पादनावर आणि जलस्रोतांवर परिणाम होतो, ज्यामुळे अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होतो.
- उष्णतेशी संबंधित आजार, जसे की उष्माघात, त्वचा विकार आणि श्वसनाचे विकार वाढतात.
- अनेक प्राणी आणि वनस्पती प्रजाती नष्ट होतात किंवा स्थलांतर करतात. वन्यजीवांसाठी त्यांचे अधिवास नष्ट होतात, तर परिसंस्थेतील संतुलनही बिघडते.
- शेती, मत्स्यव्यवसाय, पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते.
- वाढत्या तापमानामुळे वायू प्रदूषणाची पातळीही वाढते, ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. काही रोगांचा प्रसारही होतो.
-
तापमान वाढल्यामुळे हिमनदी आणि बर्फ वितळतात, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढते आणि अनेक किनारपट्टीचे भाग पाण्याखाली जातात.
-
हिमनदी आणि बर्फ वितळल्यामुळे समुद्राची पातळी वाढते, ज्यामुळे किनारपट्टीचे भाग आणि बेटं पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण होतो.