(संगमेश्वर)
आपण या महाराष्ट्रात जन्माला आलो. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती आणि पाऊल खुणा यांचाच संस्कार इथली माती शिकवते. घराघरात आता त्या संस्कारांची अवहेलना होताना दिसते. आई वडील आणि युवा अपत्यांचा संवाद हा तर आता रुक्ष होत चालला असल्याचे चित्र आहे. आई वडिलांपेक्षा जास्त समज असलेली मुले ही आधुनिक असतात. याच गैरसमजातून तुम्हाला काय कळणार? तुम्ही गप्प बसा! असा सूर उमटतो.
आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, आपण या स्वराज्याचे शिलेदार आहोत. ही भावना जपणारे लोक संस्कारांचा वसा जपत आहेत, आणि भावी पिढी हा वसा टाळण्यासाठी वळसा घेऊन अधोगतीकडे चालले आहे, याचे योग्य चित्रण या लघुपटात करण्यात आले आहे.
या लघुपटाची निर्मिती सौ.अक्षता विलास गुरव यांनी केले आहे. कथा/पटकथा/संवाद/ लेखक/दिग्दर्शक श्री.विलास शांताराम गुरव हे आहेत. छायाचित्रण सुलतान शहजाद शेख यांनी केले आहे. यात नवोदित कलाकारांनी अभिनयकौशल्य पणाला लावले आहे. त्यात प्रामुख्याने राकेश सुरेश जिमन, गणेश विश्वनाथ खरात, धनंजय चौधरी, सुहास किसन घाडी, शालिनी सुहास घाडी, संतोष गोपाळ सावंत, रचना रविंद्र गुरव, देवेश नारायण साळकर, सुभाष काशीराम तेरसे यांचे सहयोग आहे. या लघुपटासाठी विशेष सहकार्य अशोक बंडू कांबळे, प्रतिभा अशोक कांबळे, सिद्धेश्वर कृपा चाळीतील रहिवासी यांचे लाभले आहे.