(राजापूर)
तालुक्यातील हातणकरवाडी (गोठणे दोनिवडे, ता. राजापूर) येथील चंद्रकांत यशवंत लोलगे (वय ५८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. १८ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, पावसामुळे अंगणात साचलेल्या चिखलावरून पाय घसरून ते खाली पडले होते.
अपघातानंतर घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी तत्काळ त्यांना खासगी रिक्षामार्फत राजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना १०८ अॅम्ब्युलन्सद्वारे सायं. ५.४५ वाजता रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना २१ जून रोजी सकाळी ९.१५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू नोंद (आमृ. क्र. ३४/२०२५) भारतीय न्यायसंहिता २०२३ (BNSS) च्या कलम १९४ अन्वये राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.