(चिपळूण / प्रतिनिधी)
शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन सामाजिक बांधिलकी जपत उद्धव बाळासाहेब ठाकरे चिपळूण तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कन्या शाळा, बापट अळी, चिपळूण येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच कामथे येथील कुटीर रुग्णालयात आजारी रुग्णांना फळ वाटप करून पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सेवाभावी कार्याची परंपरा जपण्यात आली.
विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतिकार भगतसिंग आणि विज्ञानविषयक प्रेरणादायी पुस्तके वाटण्यात आली. यावेळी शिक्षक श्री. मांडवे यांनी मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणादायी कार्ययात्रा उलगडली. “पेरलेले विचार कधी मरत नाहीत, ते धुमारे फुटून पुन्हा फुलतात,” असे ते म्हणाले.
या वेळी शिवसेना विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाळा कदम म्हणाले, “गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेनेतर्फे ही परंपरा सुरु आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करत समाजकारणाची ज्योत पेटविणे हा आमचा उद्देश आहे. आमचं कार्य हे ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या विचारधारेवर आधारित आहे.” कार्यक्रमात कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रेरणा जाधव यांच्या हस्ते नूतन तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाळा कदम, तालुका प्रमुख बळीराम गुजर, युवा सेना तालुकाअधिकारी उमेश खताते, युवा सेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, सचिव प्रशांत मुळ्ये, सचिन शेटे, राजेश नारकर, सचिन (भैया) कदम, रमेश राजेशिर्के, जीवन घाग, नंदू शिंदे, संदीप राणे, अजित गुजर, दीपक ओकाटे, संकेत शिंदे, संजय गोताड, मोहन खापरे, मनोज पांचाळ, संजय रेडीज, विनायक वास्कर, अजय भालेकर, आकाश कदम, राहुल गुरव, आयुष कुबडे, साहिल शिंदे, राजू शिंदे, अथर्व चव्हाण, महेंद्र काणेकर, समीर माळी, मनोज जाधव, अण्णा कटगरी, बंधू कदम, पिंट्या पवार, शुभम शिंदे, तालुका सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे यांच्यासह सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.