(पाली / वार्ताहर)
“छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी!” अशा जोरदार घोषणांनी आज पाली तिठा परिसर दुमदुमून गेला. येथील ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
या ऐतिहासिक सोहळ्याची सुरुवात सकाळी श्री शिवछत्रपतींच्या दुग्धाभिषेकाने झाली. त्यानंतर पवित्र वातावरणात शिवपूजन पार पडले आणि शिवप्रेमींसह “श्री शिवराज्याभिषेक” सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. गेल्या २० वर्षांपासून हा सोहळा जिल्ह्यातील पहिला सुवर्णयोग म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली साजरा होत असतो.
कार्यक्रमात पाली बाजारपेठ व्यापारी संघाचे अध्यक्ष विश्वास सावंत, रमेश तेंडुलकर, सदानंद पोवार, स्वप्नील सावंत, शेखर सुर्वे, उमेश सावंत, अमेय वेल्हाळ, शैलेश राऊत, सौरभ खाके, सुधीर सावंत, सचिन भोगले, सुभाष धाडवे, मनोज पांचाळ, वैशाली झापडेकर यांच्यासह अनेक शिवभक्तांनी सहभाग घेतला.
या सोहळ्याला उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुभेच्छा आणि विशेष पाठबळ दिले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष व सिंधुरत्न योजना सदस्य आमदार किरण सामंत, तसेच श्रीलक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. शेवटी आयोजकांच्या वतीने पाली केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टचे गुरुनाथ गराकटे (बाबा) यांनी उपस्थितांचे आभार मानले.