(संगमेश्वर / प्रतिनिधी )
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र आज अनेक वर्ष आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे. संघटनेचे राज्य सरचिटणीस श्री.सदानंद विचारे साहेब. सेवानिवृत्त कर्मचारी यांना वर्षभराचा मोफत पास मिळावा यासाठी वारंवार सरकारशी झगडत होते.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
खरं तर संघटना का हवी ? एकीचे बळ महत्वाचे आहे. निवृत्त कर्मचारी यांना प्रथम दोन महिने पास ,नंतर सहामहीने आणि आता बारा महीन्याचा पास मिळवण्यासाठी संघटनेचे हे मोठे यश आहे. विधवांना पास मिळतच नव्हता तो ही दोन महिने मिळवून घेतला आता सहामहीने, नऊ महीनयांचा तर आता बारा महिने मंजूर झाला ईतरही लहान मोठ्या अडचणी सोडविण्याचे सुद्धा संघटना काम करत आहे. केंद्रीय कार्यकारीणी, पदाधिकारी चांगले काम करत आहेत.
भविष्यात पेन्शन, ईतर सवलती हक्क मिळविण्यासाठी आपण एकत्र असले पाहिजे सन्मान विचारे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी न्याय देऊन निवृतांचा प्रश्न मार्गी लावला त्या बद्दल त्यांना निवृत्त कर्मचारी संघटने तर्फे धन्यवाद देण्यात आले. केंद्रीय कार्याध्यक्ष श्रीराम गालेवाड केंद्रीय कोषाध्यक्ष वायफळकर यानी यासाठी संघटनेला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सभासद संख्या वाढविणे गरजेचे आहे. जे आज पर्यंत सभासद झाले नाहीत त्यांनी सभासद व्हावे आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सभासद होऊन संघटनेला बळ द्यावे असे आवाहन विजय शिंदे प्रादेशिक सचिव मुंबई प्रदेश यांनी केले आहे . पेन्शन वाढीसाठी संघटनेचा संघर्ष सुरूच आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक युनिट,विभाग यांनी सभासद संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करुन सर्वांनी एकत्र यावे असे विजय शिंदे यांनी नमुद केले आहे .