(देवरूख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यात गेले आठवडाभर पडलेल्या सोसाटय़ाच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊसामुळे काजू व आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला असल्याने फार मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.
तालुक्यात गत आठवड्यात वादळीवाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पाऊसाने शेतकरी पेरणीचे काम लांबल्याने चिंताग्रस्त झाला असताना बागायतदारांची अवस्था तर भयानक झाली आहे. वाऱ्याच्या झंझावाताने शेवटच्या टप्प्यातील आंबा व काजू पिकाची प्रचंड प्रमाणात पडझड झाल्याने बागेत आंबा काजूचा खच पडल्याने आर्थिक नुकसान झाले असल्याने बागायतदाराचे धाबे दणाणले आहेत.
अवकाळी पावसाने पेरणीची कामे रखडली असतानाच यात या पडझडीने काजू व आंबा नुकसानीने आर्थिक फटका बसला असल्याने शासनाने पडझडीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बागायतदाराकडून केली जात आहे.