(रत्नागिरी)
उन्हाळी सुट्ट्या, मैत्रीचे धागे उलगडणारा, कोकणात चित्रित झालेला एप्रिल मे ९९ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून संपूर्ण महाराष्ट्रात सध्या धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक, कोकणचे सुपुत्र रोहन मापुस्कर व या चित्रपटातील अभिनेत्री जाई म्हणजेच साजिरी जोशी हे गुरुवार दि. २९ मे रोजी रत्नागिरीत येत आहेत.
रत्नागिरीतील सिटी प्राईड सिनेमागृह येथे सायंकाळी सव्वा पाच वाजता एप्रिल मे ९९च्या शोला रोहन मापुस्कर व साजिरी जोशी हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटातील स्थानिक कलाकार अमोल रेडीज, सचिन काळे, योगेश बांडागळे, सुमंत केळकर, संचिता जोशी, स्मितल चव्हाण, अक्षता कांबळी हेही या शोला उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरीकर रसिकांनी या चित्रपटाला उपस्थित राहावे, दिग्दर्शक, अभिनेत्री यांच्या समावेत हा सिनेमा पाहावा, असे आवाहन लांजातील अमोल रेडीज यांनी केले आहे.