(रत्नागिरी)
गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर तसेच घाट परिसर, पूल, आणि रस्त्यांवर निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. एम. देवेंदर सिंह यांनी प्रत्यक्ष दौरा करून आढावा घेतला.
पाहणी दरम्यान त्यांनी संबंधित विभागांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी लांजा तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षालाही भेट देऊन कार्यपद्धतीचा आढावा घेतला. त्यानंतर लांजा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सून काळात घ्यावयाच्या दक्षता उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर राजापूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यात झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दरडप्रवण व पूरप्रवण भागांमध्ये विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. त्याचबरोबर राजापूर शहरातील पूरस्थिती उद्भवू शकणाऱ्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
१ मेपासून आजपर्यंत नुकसान तपशील –
पूर्णतः पक्की घरे – 08 (109850/-)
पूर्णतः कच्ची घरे – 0
अंशत : पक्की घरे – 52 (2499394/-)
अंशत: गोठे – 4 (207250/-)
पूर्णतः गोठे – 02 (373050/-)
मयत व्यक्ती 01 – लांजा वीज पडून
जखमी – 06
(काजरघाटी,रत्नागिरी – भिंत पडून -03, आबलोली, गुहागर -03 झाड पडून)