(रत्नागिरी)
टेनिस क्रिकेटच्या राष्ट्रीय स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या भारत कप २०२५ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व ‘स्मार्टनेट महाराष्ट्र’ संघ करणार आहे. विशेष म्हणजे, या संघाचे मालक आहेत रत्नागिरीचे सुपुत्र शैबाज उस्मान चिपळूणकर, जे स्थानिक पातळीवर तरुण उद्योजक आणि क्रीडाप्रेमी म्हणून ओळखले जातात.
संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची ताकद असणारे केतन म्हात्रे या संघाचे नेतृत्व करत आहेत. संघातील विशेष आकर्षण म्हणजे “टेनिस क्रिकेटचा किंग” म्हणून ओळखले जाणारे कृष्णा साटपुते, ज्यांच्या उपस्थितीमुळे संघाचे मनोबल आणि खेळातील गुणवत्ता अधिक बळकट झाली आहे.
भारत कप २०२५ ही स्पर्धा २७ मे २०२५ रोजी रात्री ८:०० वाजता, जमसन क्रिकेट स्टेडियम, नवसारी (गुजरात) येथे पार पडणार आहे. ही स्पर्धा संतोष नानेंकर आणि विजय अग्रवाल यांच्या संयुक्त आयोजनाखाली आयोजित केली जात आहे. देशभरातील टॉप टेनिस क्रिकेट संघ यामध्ये सहभागी होत असून, महाराष्ट्रासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
प्रत्येक रत्नागिरीकर आणि महाराष्ट्रप्रेमी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या संघाला भरभरून पाठिंबा द्यावा. ही रोमांचक स्पर्धा tennis Cricket ” YouTube चॅनेलवर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.
स्पर्धेची माहिती:
स्पर्धा: भारत कप २०२५
दिनांक: २७ मे २०२५
वेळ: रात्री ८:०० वाजता
ठिकाण: जमसन क्रिकेट स्टेडियम, नवसारी, गुजरात
संघ: स्मार्टनेट महाराष्ट्र
मालक: शैबाज उस्मान चिपळूणकर (रत्नागिरी)
कर्णधार: केतन महात्रे
मुख्य खेळाडू: कृष्णा साटपुते (“टेनिस क्रिकेटचा किंग”)
आयोजक: संतोष नानेंकर आणि विजय अग्रवाल
थेट प्रक्षेपण: YouTube – Tennis Cricket
आपला महाराष्ट्र, आपली टीम – चला एकत्र येऊन विजयाचा जल्लोष साजरा करूया!