( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तालुक्यातील मौजे विल्ये बौद्धजन विकास कमिटी,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ,तसेच मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळ,आणि मानका आप्पा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते आयु.चंद्रकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ता.१२ मे रोजी विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ९:००वा. आयु.दिपक तुकाराम कांबळे आणि जोस्ना जनार्दन कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ९:३० वा.बुद्ध पूजा पाठ, १०:वा.ध्यानसाधना- आनापानसति,त्यानंतर १०:१५ ते ११ वा.महामानवांच्या जीवनपटावर सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम,त्यानंतर ११ ते १२ अल्पोपहार,१२ ते ३ वेळेत आरोग्य साक्षरता परिसंवादात डॉ.स्वाती सोनावणे मॅडम (clinical physiologist) आरोग्यविषयक वैद्यकीय मार्गदर्शन केले. तसेच वैज्ञानिक मा.ज्योती अय्यर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी बोंडे नारशिंगे गावचे विद्यमान सरपंच गणेश कांबळे उपस्थित होते.सायंकाळी ४:३०ते ५:३० वा. महामानवांच्या कार्यप्रणालीवर आधारित विविध विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.त्यानंतर विविध खेळ आणि मनोरंजनात्मक स्पर्धा तसेच रात्री भोजनदान त्यांनतर १०:वा. सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ तसेच निबंध स्पर्धेतील आणि प्रश्नमंजुषा कार्यक्रमातील आणि मनोरंजक खेळातील स्पर्धक विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आली.
त्यानंतर रात्री १०:३० वा.मिलिंद जलसा कला निकेतन मंडळ अंतर्गत कलाकारांनी विविध सांस्कृतिक प्रबोधनी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला. संपूर्ण जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.नरेश तुकाराम कांबळे यांनी केले. हा कार्यक्रम नियोजित अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आयु.चंद्रकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.