(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील ऐतिहासिक भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मिरकरवाडा परिसरात अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी धडक कारवाई करत तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.
शनिवारी रात्री नर्मदा जेटीसमोर ब्रेक वॉटरच्या भिंतीलगत बेकायदेशीरपणे गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या सय्यद जाविद फणसोफकर (वय २६) याला रंगेहात पकडण्यात आले. हे. कॉ. आशिष भालेकर यांनी याबाबत फिर्याद दिली असून, त्याच्याविरुद्ध एनडीपीएस ॲक्ट १९८५ कलम ८(क), २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच दिवशी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मिरकरवाडा येथील रत्नदुर्ग किल्ल्याशेजारील मोबाईल टॉवरच्या खाली रमिज हमीद अब्दुल मस्तान (वय २८) हा देखील गांजासदृश पदार्थाचे सेवन करताना सापडला. या प्रकरणी पो. हे. कॉ. पंकज पडेलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तिसऱ्या घटनेत, मिरकरवाडा मच्छी शेडजवळील लाईट पोलच्या खाली सुलतान सैफ रुकनूबिन मजगांवकर (वय २२) यानेही अमली पदार्थ सेवन करताना पोलिसांच्या तावडीत सापडला. याबाबत अमोल भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारवाई करत त्याच्याविरुद्धही एनडीपीएस अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, मिरकरवाडा परिसरातील अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारवायांवर कडक नजर ठेवण्यात येत आहे.