(रत्नागिरी)
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप भारतीय नागरिकांनी आपले प्राण गमावले. या अमानुष हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खंडाळा व्यावसायिक संघाच्या वतीने आज गुरुवार, दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता खंडाळा नाका येथे एक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा जोरदार घोषणांनी झाली. यानंतर पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला आणि “भारत माता की जय” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. हा कार्यक्रम अत्यंत संयमित आणि देशभक्तिपर वातावरणात पार पडला.