(मुंबई)
मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात तीन निर्णय शिंदेंच्या विभागाचे आहेत. त्याचप्रमाणे विधी व न्याय, गृह, महसूल आणि उच्च शिक्षण विभागाचा प्रत्येकी एक निर्णय आहे. नगरविकास विभागाचे तीनही निर्णय महत्वाचे आहेत. नगराध्यक्षांबाबतचा निर्णय राजकीयदृष्ट्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण मानला जात आहेत.
भ्रष्टाचार, गैरकृत्य आदी कारणांमुळे नगराध्यक्षांना पदमुक्त करण्याचे अधिकार सदस्यांना मिळणार आहे. बहुमताच्या जोरावर नगराध्यक्षांना हटवता येणार आहे. दोन तृतियांश सदस्यांची तक्रार आवश्यक असेल. या निर्णयामुळे राजकारण तापणार आहे. नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. हा निर्णय घेण्यामागे सरकारचा नेमका उद्देश काय यावरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा केली जाणार आहे.
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :
चिखलोली-अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करणार व त्याअनुषंगाने पदे मंजूर. - राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास मंजुरी.
- नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणासाठीच्या नियमांमध्ये बदलास मान्यता
- महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा. नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशत: माफ करून करवसुली व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय
- नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींना मान्यता, महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणार.
- भूमिसंपादन, पुनर्वसन पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम-३०(३), ७२ व ८० मध्ये भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा करताना आकारण्यात येणा-या व्याजदरांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.
- लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय.