(रत्नागिरी)
शहरानजीक फणसवळे येथील एका २३ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे. युवा तरुण गमावल्याने हळहळ देखील व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
फणसवळे येथील मधलीवाडी येथे तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली ही घटना १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. साहील संतोष पाले (२३) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे. साहिल याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून राहत्या घरी आतील खोलीमध्ये वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
मात्र साहिल याने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेमुळे फणसवळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील लोकांनीही साहिलच्या शांत, मनमिळावू स्वभावाचे कौतुक करत त्याच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सुरू आहे. आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.