(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे प्रतिष्ठीत नागरिक व बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुंड चे १९७५सालच्या पहिल्या एस एस सी बॅच चे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी मधुसूदन हरी लिमये यांनी प्रशालेला रोख रुपये १ लाख ३० हजार रुपयांचा धनादेश तसेच ३ उच्च प्रतीचे सॅमसंग कंपनीचे स्मार्ट टी व्हि संच भेट म्हणून दिले आहेत.
माजी विद्यार्थी मधुसूदन हरी लिमये हे मालगुंड विद्यालयाचे १९७५ सालच्या पहिल्या एस एस सी बॅच चे माजी विद्यार्थी आहेत. ते या बॅच मधील प्रथम क्रमांक प्राप्त करून उत्तीर्ण झाले होते. नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत. टाटा पॉवर या नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होते. काही वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले आहेत. पण गावाची आपल्या शाळेची ओढ त्यांच्या मध्ये कायम होती. त्याच हेतूने ज्या शाळेत आपण शिकलो ज्या शाळेमुळे आपल्याला हे सगळ मिळालं आहे, त्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी ही देणगी आपले काका बाळकृष्ण श्रीपाद लिमये यांच्या स्मरणार्थ दिली आहे. तसेच सदर देणगी ही संस्थेकडे कायम ठेव स्वरुपात ठेव म्हणून दिली आहे त्यातून येणाऱ्या व्याजातून दहावी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला व प्रत्येक विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला रोख रुपये १ हजार चे रोख बक्षीस सदर रकमेतून देण्यात यावे असा त्यांचा मानस असून त्यासाठी सदर देणगी दिली आहे. तसेच आज शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत असून डिजिटल क्लास रूम ही संकल्पना सुरू झाली आहे. त्यामुळे शहरामध्ये जसे विद्यार्थी या सर्व गोष्टींचा लाभ घेतात व अध्यापन करतात तसेच आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील या सर्व गोष्टींपासून वंचित राहू नयेत, त्यांना सुद्धा या सर्व बाबींचा लाभ घेता यावा या संकल्पनेतून त्यांनी दिली आहे. तसेच त्याकाळात आपण जसे अध्यापन केले काही सोयी सुविधा पासून वंचित राहिलो तसे आताचे विद्यार्थी राहू नयेत या उदात्त हेतूने त्यांनी शाळेला सॅमसंग या उच्च प्रतीच्या कंपनीचे ३ टीव्ही संच अशी भारगोस देणगी शाळेला दिली आहे.
१९७५ सालची एस एस सी ची पहिली बॅच होती या वर्षी या एस एस सी बॅच ला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. हे या बॅच चे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि आपण हा सुवर्ण महोत्सव साजरा करावा अशी काही माजी विद्यार्थ्यांनी संकल्पना मांडली.सदर बॅच च्या माजी विद्यार्थ्यांनी हा सुवर्ण महोत्सव २३ फेब्रुवारी रोजी साजरा केला .हा दुर्मिळ योग साधून त्यांनी ही देणगी दिली आहे.आयोजित केलेल्या या सुंदर समारंभाला बॅच मधील बहुतांश माजी विद्यार्थी एकत्र आले होते. याच समारंभामध्ये या सर्व माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा शाळेला एक टीव्ही संच भेट दिला. याच समारंभामध्ये मधुसूदन हरी लिमये यांनी प्रशालेला रोख रुपये १ लाख ३० हजार रुपये चा धनादेश तसेच ३ टीव्ही संच मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या कडे सुपुर्द केले.
या समारंभाला ३२ पेक्षा जास्त माजी विद्यार्थी उपस्थित होते एक सुंदर समारंभ पार पडला. या सर्व माजी विद्यार्थ्यांना शिकविणारे सर्व माजी शिक्षक त्यामध्ये श्री व सौ फडके, काणे, बापट, खेर, आंबेकर हे माजी शिक्षक व कृष्णा आग्रे हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते. याच समारंभामध्ये त्यांनाही सन्मानित करण्यात आले. तर माजी विद्यार्थ्यांमध्ये मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमान सल्लागार मंडळाच्या सदस्या यशश्री पवार, शुभदा जोशी, विष्णू साळवी, भाई गांगण, शाम केळकर, मधुसूदन लिमये, शोभा काटकर, तसेच बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते. या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लाडू वाटप देखील केले.
प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज ला माजी विद्यार्थी मधुसूदन हरी लिमये व १९७५ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या एस एस सी बॅच च्या सुवर्ण महोत्सवी वर्षा प्रीत्यर्थ जी भरघोस देणगी दिली व एक वेगळा आदर्श इतर माजी विद्यार्थ्यांसमोर घालून दिला त्या बद्दल मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत,खजिनदार संदीप कदम, तसेच सर्व संचालक मंडळाने व प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी धन्यवाद दिले आहेत.