(चिपळूण)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदू समाज जिवंत आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदुधर्मासाठी जगावे व एकत्र यावे, असे प्रतिपादन जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे त्यांना मराठा समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक हॉल समोरील मैदानावर हा सोहळा झाला. या सोहळ्याला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जगद्गुरुश्री पुढे म्हणाले, “हा पुरस्कार मी माझ्या विचारावर प्रेम करणाऱ्यांना समर्पित करतो. ‘तुम्ही जगा व दुसऱ्याला जगवा’ या विचारांनी मी काम करतो.” असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. छत्रपती शिवरायांची गुणवैशिष्टे सांगितली. संस्कार, स्वाभिमान,धैर्य, एकात्म भाव, संघटन कौशल्य आदी त्यांच्या गुणांचा गौरवाने उल्लेख केला.
या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवव्याख्याते नामदेवराव जाधव, दिलीप दादा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार मिळालेले असे – स्व .माजी खासदार गोविंदराव निकम, स्व. नाना जोशी. स्व.राजाराम शिंदे, स्व.बाळासाहेब माटे, स्व.केशवराव भोसले, यांना त्यांच्या कार्याबद्दल मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. त्यांच्यावतीने नातेवाईकांनी सदर पुरस्कार स्वीकारला.
मराठा भूषण पुरस्कार
मराठा समाज-भूषण पुरस्काराने अनेकांना सन्मानित करण्यात आले त्यामध्ये दैनिक रत्नागिरी टाईम चे संपादक उल्हासराव घोसाळकर, गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम, राजापूरचे आमदार किरण सामंत, सदाशिवराव भोसले, प्रकाशजी देशमुख, कोकरे महाराज, विनोद चाळके आशिफ बामणे, शौर्य पुरस्कार योगिता खाडे, क्रिडा पुरस्कार हरिशदादा सावंत यांना क्रीडा क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आला. यांच्यासह समाजासाठी कार्य करणाऱ्या बांधवांनाही यावेळी पुरस्कार देण्यात आला.