(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे ग्राम शाखेचे धडाडीचे माजी अध्यक्ष ,निवृत्त भारतीय आर्मी सैनिक (हवालदार) सन १९७१ च्या भारत विरुद्ध पाकिस्तान युद्धातील महार बटालियन मधील योद्धा रामचंद्र देमा सावंत यांचे कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. काल कथित आर.डी .सावंत यांची शोकसभा रविवार दि ४ जानेवारी रोजी कोळीसरे येथे आयोजित करण्यात आली आहे.
आर्मी माजी सैनिक रामचंद्र देमा सावंत यांनी देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित केले.भारत विरुद्ध पाकिस्तान युद्धामध्ये त्यांची कामगिरी अनमोल ठरली. निवृत्तीनंतर त्यांनी अनेक व्याख्यानातून देशभक्तीचा अंगीकार फुलविला होता. माजी सैनिक आर डी.सावंत यांच्या निधनाबद्दल रत्नागिरी तालुक्यासह विविध सामाजिक, धार्मिक संघटना,भारतीय सैनिक दलाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.माजी निवृत्त सैनिकांनी पुष्पचक्र वाहून आर.डी सावंत यांना शुक्रवारी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आर.डी. सावंत हे हरहुन्नरी, अष्टपैलू आणि कणखर व्यक्तिमत्त्व होते. रत्नागिरी तालुका न्याय निवाडा समितीचे ते सदस्य होते. दीक्षाभूमी वाट खंडाळा संघटनेचे उपसभापतीपदी कार्यरत होते. त्यांनी बोद्धाचार्य म्हणूनही प्रशिक्षण घेतले होते .त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,दोन मुली, सुना ,जावई ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा जलदान विधी ४ जानेवारी रोजी कोळीसरे येथे आयोजित करण्यात आला आहे.

