(रत्नागिरी)
जयगड ते गणपतीपुळे मार्गावर आज (शनिवार, २८ जून) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात करबुडे परिसरातील ‘हॉटेल विसावा’जवळील वळणावर घडला. ही घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक यासीन मक्तुंब साब मट्टिको (वय ३५, रा. संपगाव, ता. बैलहोंगल, जि. बेळगाव) हा आपल्या ताब्यातील ट्रॅक ( नंबर KA-22-D-5303 ) जयगडमार्गे घेऊन जात असताना, MH-08-P-4412 या क्रमांकाच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. या मोटारसायकलवर रवींद्र गोविंद पाचकुडे (वय अंदाजे ४०) हे चालक होते आणि त्यांच्या मागे पत्नी रविना रवींद्र पाचकुडे (वय अंदाजे ३५) या होत्या. दोघेही पाचकुडे वाडी, करबुडे येथील रहिवासी आहेत. या अपघातात रवींद्र पाचकुडे यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या पत्नीला देखील मार लागला आहे.
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील, पो. उपनिरीक्षक सी. जी. जाधव, कॉन्स्टेबल रसाळ (क्रमांक ३४७) आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल पोवार (क्रमांक ९१७) यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने खाजगी वाहनाने रत्नागिरी येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. असे असून, अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.