(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती कळझोंडी शाखा क्रमांक ११ मुंबई या शाखेचे विद्यमान सभापती व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद रामचंद्र पवार यांच्या पत्नी संघमित्रा गोविंद पवार यांचे शुक्रवार दि. २० जून रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ७७ व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले. मुंबई येथे संघमित्रा गोविंद पवार यांनी शासकीय आरोग्य सेवेत सी.जी.एस. डिसपेंसरीमध्ये ३० वर्षे नर्स कुलाबा, माटुंगा, सांताक्रुज, माहिम अशा अनेक ठिकाणी उत्तम सेवा केली.
शासकीय आरोग्य सेवेत असताना ही त्यांनी आदर्श गृहिणी, हस्तकलेच्या माध्यमातून त्यांनी घरी, बुद्ध विहारी दर्शनी भागात तोरणं स्वत:विनण्याचा छंद अविरतपणे जोपासला होता.अत्यंत कष्टाळू, मायाळू, नातेवाईक , पाहुणे यांचा आदरातिथ्य करण्याची चांगली परंपरा त्यांनी आयुष्यभर जोपासली. भ.बुध्द , महात्मा फुले, छ.शिवराय, छ. शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,माता रमाई यांच्या विचारधारेवर त्यांची फार मोठी श्रद्धा होती.आपले पती सामाजिक कार्यकर्ते जी.आर. पवार यांच्या सामाजिक व धार्मिक कामात त्यांनी अतिशय निष्ठेने साथ दिली. आपले पती, ६ मुले यांचा त्यांनी चांगला साभाळ केला.
कालकथित संघमित्रा पवार यांचा जलदान विधी श्रध्दांजली सभा रविवार दि. २९ जून रोजी सकाळी ११ वाजता गोराई मुंबई येथे गोविंद रामचंद्र पवार यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे.
कालकथित संघमित्रा पवार यांच्या पश्चात्य पती,५ मुली,जावई, मुलगा, सून, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. संघमित्रा पवार यांच्या निधनाबद्दल कळझोंडी बौद्धजन पंचायत गाव शाखा व मुंबई कमिटीनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.