(कळझोंडी / किशोर पवार)
कोकणदीप मासिकाच्या २३ वा वर्धापन दिन मुबंई मराठी ग्रंथ संग्रालय दादर येथे मा.ना.श्री योगेशदादा कदम साहेब (राज्यमंत्री गृह (शहरे) महसूल, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन विभाग ) यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी सामाजिक शैक्षणिक,साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना कोकणदीप च्या विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये रत्नागिरीतील विल्ये गावचे सुपुत्र लेखक, कवी,पत्रकार मा.अमित जयवंत कांबळे यांचा साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.अमित कांबळे यांनी सामाजिक विषयावर अनेक माध्यमातून आपल्या लेखन शैलीतून प्रभावी भाष्य केले आहे.काव्यलेखन, लेख लेखन, स्तंभ लेखन, नाट्य लेखन,सामाजिक गीत लेखन, तसेच विविध वृत्त पत्रातून बातमी लेखन प्रसिद्ध करून अनेकांना प्रोत्साहन दिले आहे.या त्यांच्या प्रभावी कार्यकृतीचा गौरव कोकणदीप ने साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला.
याप्रसंगी मंचावर श्री.सुधीरभाऊ कदम (शिवसेना संपर्क प्रमुख -दापोली विधानसभा), डॉ.सुकृत खांडेकरn(जेष्ठ पत्रकार, संपादक दैनिक प्रहार), श्री संतोष परब (महाराष्ट्र शासन समाज भूषण पुरस्कार प्राप्त),बीडॉ.राम मेस्त्री (साहित्यिक),बीश्री.प्रवीण घाग (गिरणी कामगार नेते), कोकण दीप चे संपादक दिलीप शेडगे, रत्नागिरीतील किशोर पवार (पत्रकार) तसेच जागृत वाचक समीक्षक सौ.सोनाली देसाई कदम, रत्नागिरीतील बसणी गावातील नाटककार नामवंत कलाकार कोकण दीप पुरस्कार विजेते श्रीकांत पाटील आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उपस्थित साहित्यिक वर्ग आणि वाचकवर्गाला कोकणदीप कडून विशेषअंक भेट देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद महाडिक यांनी अतिशय प्रभाविपणे केले. तसेच आभार प्रदर्शन संपादक श्री.दिलीप शेडगे यांनी मानले.