(रत्नागिरी)
दिनांक 12/06/2025 रोजी दुपारी सुमारे 3:30 वाजता, “माहेर संस्था”, निवळी हातखंबा, रत्नागिरी येथील मुलींच्या बालगृहातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. कु. पुनम अनिल कांबळे – वय 15 वर्षे आणि कु. प्रिती रवि बनसोडे – वय 17 वर्षे अशी त्यांची नावे आहेत.
सदर दोन्ही मुली बालगृहात पालन-पोषणासाठी दाखल होत्या. त्या दिवशी संस्थेच्या कंपाउंडशेजारी असलेल्या नळावर कपडे धुण्यासाठी गेल्या असताना, अज्ञात व्यक्तीने त्यांचा अल्पवयीन वयाचा गैरफायदा घेत त्यांना संस्थेच्या कायदेशीर देखरेखीमधून पळवून नेले असल्याचा संशय आहे. सदर मुलींचा तपशील पुढीलप्रमाणे
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्र. 117/2025, भा.दं.सं. कलम 137 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर मुलींबाबत कुणालाही कोणतीही माहिती असल्यास कृपया खालील क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा:
📞 पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक: 02352-230133
📱 मोबाइल: 9321211516
आपली माहिती गुप्त ठेवण्यात येईल. दोन निरपराध मुलींच्या सुरक्षेसाठी कृपया सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.