(मुंबई)
बेस्ट वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष, जेष्ठ कामगार नेते आणि आंबेडकरी चळवळीतील प्रभावी, बंडखोर कवी, अनिल जाधव यांच्या सेवानिवृत्तीप्रित्यर्थ बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा विभागाच्या पाठकवाडी आगार येथे दि. ३० मे २०२५ रोजी त्यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. उपमुख्य अभियंता श्री. शिवदास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभास बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राब, माजी अध्यक्ष सो.ना. कांबळे, ॲड. उदय आंबोणकर, रंगनाथ सातवसे, राजेंद्र शिरगावकर, विवेक घोलप, जयवंत तावडे, नरेश ठाकूर, एडव्हो. नरेंद्र जाधव, अधिक्षक अभियंता नागवेकर, एडव्हो, संदिप जाधव, एडव्हो राजाराम यादव, विलास वाघ, भगवान खुपटे, धर्मादास कदम, वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्रिपत मोहिते, यांच्यासह अनेक नामवंत कामगार नेत्यांची उपस्थिती लाभली.
जाधव यांना जरीचा फेटा, शाल, जयभीम स्कार्फ, सुवर्णमुद्रा, संविधान आणि चळवळीचे साहित्य संच व विविध भेटवस्तूंनी गौरवण्यात आले. त्यांच्या पत्नी मनिषा जाधव यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात जाधव यांचे सहकारी, स्नेही व कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एक भावनिक क्षण म्हणून अर्धांगवायूने ग्रस्त सहकारी अनिल जेकटे यांची त्यांनी घेतलेली गळाभेट सर्वांना अश्रू अनावर करून गेली.कामगार नेत्याची झुळ पांघरूण घेऊन न फिरता अनिल जाधव यांनी सर्वसामान्य कामगारांशी कसे मित्रत्वाचे, आपुलकीचे ऋणानुबंध जोडले होते.हे याचे उत्तम उदाहरण ठरते.अनिल जाधव यांनी सेवा काळात बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील कामगारांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, विश्रांती गृह, अपघातग्रस्त कामगाराला अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या मसिना हौस्पिटल मध्ये उपचारासाठी केलेला संघर्ष, अपघातात मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना अपघात नुकसानभरपाई कायद्याची अंमलबजावणी करून कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच बेस्ट मधील सीएल ( कंत्राटी कामगार) कामगारांची वैद्यकीय चाचणी महाव्यवस्थापक खोब्रागडेशी बैठक घेऊन बंद करून घेतली आहे. कामगारांच्या दैनंदिन समस्या, अडिअडचणी वेळी हक्काचे ठिकाण म्हणजे अनिल जाधव हा विश्वास कामगारांना होता याचेच प्रतिक अनिल जाधव यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा दुपारी ३:३० ते रात्री आठ वाजेपर्यंत दिर्घकाळ चालला.
३३ वर्षांच्या बेस्ट सेवेत अनेक प्रमोशन नाकारून ‘ज्येष्ठ नवधनी’ पदावरून त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. बेस्ट वर्कर्स युनियनच्या माध्यमातून ते नेहमी आंदोलनांच्या अग्रभागी राहिले. त्यांची ‘रायटिंग व फायटिंग’ शैली त्यांना वेगळेपण देऊन गेली. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरते. करबुडे (रत्नागिरी) येथे उभारण्यात आलेल्या ४२ फुटी सफेद मार्बल अशोकस्तंभासाठी त्यांनी स्वतःच्या वेतनातून लाखो रुपयांचे धम्मदान केले.तसेच जन्मभूमीत भव्यदिव्य बांधण्यात संबोधि बुद्ध विहार उभारणीत त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे.सन २०२२ मध्ये अनिल जाधव यांच्या पुढाकाराने कपिल वास्तू नगर करबुडे येथे पाच आणि सहा फुट उंचीच्या बुद्ध मूर्ती तसेच दिड फूट उंचीच्या बुद्ध मूर्तीचे वाटप करण्यात आले होते. ज्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील बौद्ध धर्मीय समाज बांधव उपस्थित होते.आणि या त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा सत्कार म्हणून त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनेही करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनय पवार, सचिन पवार, दीपक जाधव, मनोज गमरे, विनोद जाधव, विनोद यादव, चंद्रवदन गायकवाड, दिपक चंदनशिवे, बि.आर.जाधव, संजय सुर्वे, विजय रोकडे, आशिष लोहकरे, गणेश बोस, गणेश ढोबळे,नअरूण नाईक, प्रल्हाद कोयंडे, जगदीश पवार आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. बेस्ट उपक्रमातील एका लढवय्या कामगार नेत्याला अश्रु नयनांनी निरोप देत, उपस्थितांनी त्यांचे कार्य स्मरणात राहील, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.