(रत्नागिरी)
तालुक्यातील शिवार आंबेरे येथे एका ४२ वर्षीय व्यक्तीने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १८ मे रोजी घडली. संजय विश्राम पेजे (वय ४२, रा. शिवार आंबेरे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते एका खाजगी नोकरीत कार्यरत होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संजय पेजे यांनी १८ मे रोजी दुपारी सुमारे १२ वाजता “मुलांसाठी आंबे आणतो” असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र, दुपारी ३:३० वाजेपर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी चिंतेने शोधाशोध सुरू केली. सायंकाळी सुमारे ४ वाजता ते शिवार आंबेरे येथील चिचबाऊल परिसरात एका आंब्याच्या झाडाला पांढऱ्या ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.