(रत्नागिरी)
रत्नागिरी नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी वैभव गारवे यांची आज (२८ एप्रिल) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. पक्षाच्या वतीने श्री. गारवे यांचे स्वागत करताना शहरातील विविध समस्या व प्रलंबित कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मे महिना सुरू होऊनही पावसाळ्यापूर्वीची महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण असल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. विशेषतः शहरातील नाल्यांची व गटारांची सफाई कामे सुरू न झाल्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याशिवाय, शीळ धरणापासून जॅकवेलपर्यंतच्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या स्थितीवरही सखोल चर्चा करण्यात आली.
या भेटीत शिवसेना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, उपशहरप्रमुख सलील डाफळे, माजी नगरसेविका रशिदा गोदड, राजश्री शिवलकर, विभागप्रमुख प्रशांत सुर्वे, संदेश भिसे, शकील मालदार, साजिद पावसकर, राजाराम राहटे, युवासेना शहरप्रमुख आशिष चव्हाण, महिला उपशहरप्रमुख विजया घुडे, उन्नती कोळेकर, महिला विभागप्रमुख पूजा जाधव, रूपाली तवसाळकर, राजश्री लोटणकर, प्रवीण शिवलकर, बिपीन शिवलकर, बाबू बंदरकर आणि तुषार कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.