(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच धर्मादाय रुग्णालयांत समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अत्यंत गरजू रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. निर्धन रुग्णांना मोफत उपचारांची तर दुर्बल घटकातील रुग्णांना ५० टक्के सवलतीने वैद्यकीय सेवा दिली जाते.
धर्मादाय अधिनियम १९५० अंतर्गत ही रुग्णालये समाजसेवेच्या उद्देशाने चालवली जातात. यांना आवश्यक निधी हा दानधर्मातून किंवा सामाजिक संस्थांकडून मिळतो. रुग्णालयांनी राखीव खाटांचा लाभ नाकारल्यास त्यांच्यावर सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाद्वारे कारवाई होऊ शकते.
जिल्ह्यात सध्या खालील पाच धर्मादाय रुग्णालये कार्यरत आहेत:
1. दिवालीबेन मोहनलाल मेहता लायन्स आय हॉस्पिटल, रत्नागिरी
2. बी. के. वालावलकर रुग्णालय, डेरवण (ता. चिपळूण)
3. नॅब आय हॉस्पिटल, चिपळूण
4. एम. ई. एस. ए. एम. परशुराम हॉस्पिटल, लोटे (ता. खेड)
5. योगिता डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, घाणेखुंट व खेड
या रुग्णालयांनी गरजूंसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवणे बंधनकारक आहे.