(पालघर)
उन्हाच्या काहिलीने हैराण झालेले अनेकजण समुद्र, नद्या, बंधारे आणि कालव्याच्या पाण्यात डुबण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र बऱ्याचदा पोहोताना काही अनर्थ घडल्याच्या घटनाही सातत्याने समोर येताना दिसत आहेत. अशातच जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोहायला गेलेल्या अभिषेक बिऱ्हाडे या तरुणाचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत लक्ष मर्दे हा विद्यार्थी कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाला होता, त्याचाही मृतदेह सापडला आहे. सूर्या नदीमध्ये अभिषेक बिऱ्हाडे नामक तर कालव्यात लक्ष मर्दे यांचा मृत्यू झाला.
सध्या प्रचंड उकाडा असल्याने नदी, नाले, ओढे, खदानी, किनारे भागात गारवा मिळावा म्हणून पोहण्यासाठी येतात. यामध्ये तरुणांची संख्या मोठी असते. अशीच गर्दी रविवारी मासवण सूर्या नदीवर झाली होती. अभिषेक बिन्हाडे हा चोवीस वर्षीय तरुण आपल्या मित्रांसोबत पोहायला आला होता. पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज त्याला आला नाही. याचवेळी पोहताना तो पाण्यात गेला असता तेथे बुडाला.
काही वेळ तो बाहेर न आल्याने त्याच्या मित्रानी स्थानिक व पोलिसांना ही माहिती दिली. तातडीने शोध मोहीम राबवून अभिषेकचा मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढला गेला. दुसन्या घटनेत डहाणू तालुक्यातील सारणी येथील सूर्या कालव्यामध्ये पोहत असताना धाकटी डहाणू येथील दक्ष सागर मर्दे हा विद्यार्थी वाहून गेल्याने बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिक आणि पोलीस कालव्याच्या खालच्या भागात त्याचा शोध घेत असताना रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला