(रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनेक अडचणी आल्या, पण काळजी करू नका, येत्या जून महिनाअखेर महामार्गाचे काम १०० टक्के पूर्ण होईल, अशी नवीन डेडलाईन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात दिली होती. मात्र, महामार्गाच्या एकंदरित कामाच्या परिस्थितीवरून ही डेडलाइनही हुकणार असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
२०१८ पासून या महामागाचें काम पूर्ण होण्याच्या अनेक डेडलाइन लोकनेत्यांकडून देण्यात आल्या आहेत, आताही दिलेली डेडलाइन फेल जाणार असल्याचे दिसून येत आहे. कारण, कोलाड-अविवाडी बाजारपेठेतील उड्डाण पुलाचे काम अपूर्ण स्थितीत असून, हा पूल पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल, हे देखील सांगता येत नाही. नवीन डेडलाइन संपण्यासाठी अडीच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे या अडीच महिन्यांत हे काम काम पूर्ण होणे शक्य नाही. पनवेल ते कासू ४२ किमी या टप्याची वर्क ऑर्डर २८ मार्च २०२३ रोजी देण्यात आलेली असून ३१ डिसेंबर २०२३ काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. या टप्प्यात ३८ किमी काँक्रीट पूर्ण झालेले असून नित्कृष्ठ दजांचे काम करण्यात आलेले आहे. तर अद्यापही साईट पट्टी, दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावणे, ड्रेनेज लाइन, सूचना फलक यांसारखी कामे अद्यापही अपूर्ण आहेत व या टप्प्यात ६ महिन्याच्या आत महामार्गाला खड्डे पडलेले आहेत. हा टप्पा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होता परंतु अद्यापही हे काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याचा नेम नाही.
कासू ते इंदापूर -४२ किमी या टप्याची वर्क ऑर्डर ऑक्टोबर २०२२ रोजी देण्यात आलेली असून ३१ मे २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. या टप्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. अद्यापही या टण्याची एक मार्गिका झालेली नाही. कासू ते वाकण महामार्ग नसून पायवाट झालेली आहे. महामार्गाला पेव्हर ब्लॉक दिसत आहेत. या टप्याचे काम तिवसाला १०० मीटर होत आहे यानुसार अंदाज लावल्यास हा महामार्ग वेळेत पूर्ण होईल याची शाश्वती नाही.
खेड रेल्वे स्थानक येथील ब्रिजचे काम अपूर्ण असून परशुराम घाटातील परिस्थिति बिकट आहे, हा घाट क्षेत्रात योग्यरीत्या व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काम अपेक्षित आहे. याठिकाणी अद्यापही बरेचसे काम बाकी आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आह. या टप्यात चिपळूण येथील बिज दुर्घटना घडली व यानंतर हा ब्रिज तोडण्यात आला व नव्याने ब्रिजचे काम सुरू आहे.
लांजा शहरांत उड्डाणपुलाचे काम चालू असून अंदाजित ३ ते ३.५ किमी लांबीचे हा उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाचे काम अतिशय धिम्या गतीने चालू असून दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड किमान प्रवासासाठी डांबरी असावेत जेणेकरून प्रवासाला अडथळे निर्माण होणार नाहीत परंतु मातीचा रोड असल्याने धुळीचा सामना स्थानिकांना करावा लागत आहे.
संगमेश्वर या उड्डाणपुलाचे काम अतिशय धिम्या गतीने चालू असून ४ कामगार काम करीत आहेत. संगमेश्वर येथे अगदी सकाळपासून ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. सावित्री नदीवरील पूल जर ६ महिन्यात पूर्ण होऊ शकतो तर संगमेश्वर मधील उड्डाणपुलाचे काम का होऊ शकत नाही असा प्रश्न आहे. आरवली येथे सर्व्हिस रोडचे काम चालू असून ५-६ फूट खोल ड्रेनेज लाईन खोदकाम केले आहे.