(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथे १०० एकर जमिनीमध्ये भव्य दिव्य स्मारक उभारण्यात यावे अशी सरकारकडे आमची आग्रही मागणी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषद केली.धामणी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे सतीश पटेल, अमित ताठरे, राजन कापडी, धनंजय पाथरे, प्रथमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
श्री जठार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, श्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे; महसूल राज्यमंत्री योगेश कदम, पालकमंत्री उदय सामंत, नितेश राणे यांनी बजेट मधून संभाजी स्मारकासाठी ५ कोटी रुपये मंजूर केले त्याबद्दल माझ्याकडून आणि शिवप्रेमी यांच्याकडून धन्यवाद. कसबा गावात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे परंतु त्यासाठी १०० एकर जमीन अधिग्रहित करुन त्यामध्ये हे स्मारक उभे करण्यात यावे अशी माझी आग्रही मागणी आहे. भव्य दिव्य स्मारकामध्ये हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले आहे त्यांचे योगदान आणि भव्य प्रतिमा याठिकाणी उभारण्यात याव्यात, तसेच भव्य दिव्य स्मारकाकडे जाण्यासाठी रस्ते उभारण्यात यावेत त्यासाठी महामार्गापासून जवळचा मार्ग बनविण्यात यावा अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी केले.