बेदरकार वाहतूक आणि त्यामुळे वाढते अपघात त्यातून होणारी प्राणहानी टाळण्यासाठी सरकारने आता कडक पाऊले उचलली आहेत. आता जर तुम्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला तब्बल दहा पट दंड भरावा लागणार आहे. कारण नवीन मोटार वाहन दंड २०२५, १ मार्च २०२५ पासून लागू झाला आहे. दंडाव्यतिरिक्त, तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेची देखील तरतूद करण्यात आली आहे. १ मार्च २०२५ पासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना पकडलेल्या गुन्हेगारांना वाढीव दंड, संभाव्य तुरुंगवास आणि अनिवार्य समुदाय सेवेसह कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल. वाहतूक नियम दंडात आता दुरुस्ती करण्यात आली असून या दुरुस्तीचे उद्दिष्ट निष्काळजीपणे वाहन चालवण्याच्या वर्तनांना आळा घालणे आणि देशभरातील रस्ते सुरक्षा वाढवणे हे आहे.
नियमभंग करुन वाहन चालवल्याबद्दलच्या दंडांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सुरुवातीला, अशा गुन्ह्यांसाठी 1,000 ते 1,500 रुपयांपर्यंत दंड आकारला जात होता. आता नवीन नियमांनुसार, प्रथमच नियम मोडणारांसाठी 10 हजार रुपयांपर्यंत दंड वाढला आहे आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. ज्यांच्या नियमभंग करुन वाहन चालवताना वारंवार पकडले जाणाऱ्यांसाठी, दंडाची रक्कम 15 हजारांपर्यंत वाढली आहे. तर दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ही होऊ शकतो.
वाहतूक नियमांमध्ये बदल
रहदारीच्या उल्लंघनासाठी नवीन दंड
वाहतूक शिस्तीवरील पकड आणखी घट्ट करण्यासाठी, मूलभूत सुरक्षा उपायांचे पालन न केल्याबद्दल दंड देखील वाढविण्यात आला आहे. मोटारसायकल चालवताना हेल्मेट न घातल्यास आता परवाना तीन महिने निलंबित होऊ शकतो तसेच 1 हजार रुपये दंड आकारला जातो. त्याचप्रमाणे, सीट बेल्ट न घातल्यास, सुरक्षेची मूलभूत आवश्यकता 1 हजार रुपये दंड आकारला जातो. वाहन चालवताना मोबाइल फोन वापरणे हे कारवाईत समाविष्ट आहे. तो दंड केवळ 500 रुपयांवरून 5,000 रुपयांपर्यंत वाढवला गेला.
असा आहे दंड
- वैध परवाना किंवा विमा यासारख्या आवश्यक कागदपत्रे नसताना वाहन चालवल्यास अनुक्रमे 5 हजार आणि 2 हजार रुपये दंड आकारला जाईल.
- याच नियमभंगाची पुनरावृत्ती करणाऱ्यांना अतिरिक्त दंड बसू शकतो, त्यांना तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो
- विशेष म्हणजे, प्रदूषण प्रमाणपत्र (PoC) नसल्याबद्दलचा दंड 10 हजार रुपयांपर्यंत वाढला आहे. संभाव्यत: सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.
- ओव्हरलोडिंग वाहनचालकांकडून जर नियमभंग झाला तर पूर्वी 2 हजार रुपये दंड होता, परंतु आता तो 20 हजारांपर्यंत वाढला आहे.
- अल्पवयीन मुलांसंदर्भात वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणात दंड आणखीनच कठोर करण्यात आला आहे. त्यांना 25 हजारांचा दंड, तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, वाहन नोंदणी रद्द करणे आणि वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत परवाना मिळणार नाही असा नियम आहे
- मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल सुधारित दंडामध्ये आता 10 हजार रुपये दंड आणि पहिल्या गुन्ह्यासाठी 15 हजार रुपये आणि त्यानंतरच्या उल्लंघनासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास, 10,000 रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाचा समावेश आहे.
- हेल्मेटशिवाय वाहन चालवल्यास 1,000 रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी परवाना निलंबन
- वाहन चालवताना मोबाईल फोन वापरल्यास दंडाची रक्कम 5 हजार रुपये झाली आहे.
- वैध कागदपत्रांशिवाय वाहन चालवल्यास लायसन्स नसल्यास 5 हजार रुपये आणि विमा नसल्यास 2 हजार रुपये दंड होऊ शकतो.