(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे बळीराम परकर विद्यालय मालगुंड चे १९६६ सालचे माजी विद्यार्थी गेली १५ वर्षे सलग एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतात. या वर्षी दिनांक ५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता या बॅच चे एकूण ७० माजी विद्यार्थी एकत्र आले होते, आणि एका गोड कार्यक्रमाचे आयोजन समुद्र स्पर्श बीच रिसॉर्ट मालगुंड येथे केले गेले होते.
सत्तर पंचाहत्तरी ओलांडलेले हे सर्व माजी विद्यार्थी उत्साहाने एकत्र आले होते, आणि एकमेकांची सुखदुःख जाणून घेतली. दरवर्षी हे सर्व जण न विसरता आपली सर्व कामे, आजारपण बाजूला ठेवून न विसरता एकत्र येतात आणि आपल्या जुन्या मित्र मैत्रिणीं सोबत जुन्या आठवणींना उजाळा देतात, बालपणीचे जुने दिवस आठवून त्यामध्ये हरवून जातात, आपल्या आयुष्यातील चांगले वाईट अनुभव एकमेकांना सांगतात.
१४ मार्च २०१० रोजी पहिल्यांदा हे सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले. आज या वर्षी या गोष्टीला १५ वर्षे पूर्ण झाली असून आजही या सर्व माजी विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या सारखाच उत्साह दिसून येतो. एवढी वर्षे होऊनही हे सर्व जण एकमेकांच्या संपर्कात आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आताच्या काळात अशा प्रकारचे एकमेकांशी असलेले ऋणानुबंध या सर्व मंडळींनी आजही चांगल्या प्रकारे जपले आहेत, हे अतिशय महत्त्वाचे आहे.
या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थी विभाकांत पेनकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या. गप्पा गोष्टी स्नेहभोजन तसेच शुभेच्छा देऊन या सर्व माजी विद्यार्थ्यांनी जे आता स्वतः आजी आजोबा झालेले आहेत, त्यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी श्री व सौ पेनकर, सुभाष चव्हाण, रमेश काणे, जयेंद्र सुर्वे, शंकर आंबेकर, सुधा मंत्री, म्हसकर, बी डी साळवी, भाटकर, राम पेनकर, नंदकुमार. डिंगणकर, विभाकांत पेनकर हे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.