(खेड)
चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाज, रत्नागिरी जिल्ह्याचे द्वितीय स्नेहसंमेलन हॉटेल बिसु – भरणेनाका – खेड येथे रविवार दिनांक २ मार्च २०२५ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी या तालुक्यातून ज्ञाती बांधव संमेलनाला उपस्थित होते.
अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष समीरजी गुप्ते, उपाध्यक्ष चंद्रशेखरजी देशपांडे, सचिव रामानंदजी सुळे, विश्वस्थ श्री नागेश कुळकर्णी, श्री क्रांतीकुमार कुळकर्णी, कमिटी मेंबर श्री श्रीकृष्ण चित्रे – पनवेल, सौ. गौरी राजे पनवेल, श्री गिरिष गडकरी सचिव पनवेल, एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री अजित कोंढवीकर, कार्याध्यक्ष श्री अमोल प्रधान, नागोठणे सी के पी समाजाचे अध्यक्ष श्री सुहास गरुडे, महाराष्ट्र राज्य माहिती खात्याचे सेवानिवृत्त संचालक तथा नव्वद देशात प्रसारित होणाऱ्या न्युज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक श्री देवेंद्रजी भुजबळ, श्री प्रकाश गुप्ते – फलटण, श्री भाई ताम्हणे – पुणे आदी मान्यवर या संमेलनात सहभागी झाले होते. खुली चर्चा या फोरममधे ज्ञाती बांधवांना भेडसावणाऱ्या समस्या यावर खूप उपयुक्त चर्चा झाली, अनेक विषय हाताळले गेले. हे संमेलन यशस्वी होणेसाठी संस्थापक जिल्हा अध्यक्ष श्री सुनिल शरद चिटणीस, खेड तालुका ॲडमिन श्री सौरभ शामकांत चिटणीस, सुदीप गुप्ते चिपळूण स्वाती गुप्ते चिपळूण, शिवानी प्रधान दापोली, उदय देशपांडे देव्हारे – मंडणगड यांनी खूप मोलाची मदत केली. या संमेलनाचे सुत्रसंचालन श्री रोहित कुळकर्णी -चिपळूण यांनी सुंदरच केले.
“समाजाशी आपली बांधिलकी” या विषयावर श्री देवेंद्र भुजबळ यांनी त्यांचे अनमोल विचार मांडले. श्री समीरजी गुप्ते, श्री चंद्रशेखर देशपांडे, अध्यक्ष श्री सुनिल चिटणीस यांनी त्यांच्या त्यांच्या मनोगतातून आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी काय करता येईल यावर त्यांचे विचार उद्धृत केले. उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात प्रत्येकाशी संवाद साधत हे संमेलन संपन्न झाले.