(रत्नागिरी)
सागरी महामार्गावरील काळबादेवी ते आरे-वारे या पाच किलोमीटरच्या टप्प्यातील समुद्र किनाऱ्यावरील सर्व्हेक्षण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पूर्ण केले आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात या मार्गाचे अंदाजपत्रक तयार करून ते मंजूरीसाठी शासनाला सादर केले जाणार आहे.
रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे काम वेगाने सुरू असून काळबादेवी येथील खाडीवरील पूल बांधण्यात येणार आहे. त्याचा ठेकेदारही निश्चित झालेला आहे. पुढील रस्त्याबाबात एमएसआरडीसीतर्फे स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली होती. काळबादेवी गावातून रस्त्यासाठी दोन पर्याय ठेवलेले होते. त्यामध्ये शेतजमीन आणि काही लोकांची घरे जाण्याची शक्यता होती. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी त्याला कडाडून त्यावेळी काळबादेवी विरोध केला. ग्रामस्थांनी किनाऱ्यावरून आरे-वारेपर्यंत मार्ग न्या, अशी सूचना केली होती.
एमएसआरडीसीतर्फे पंधरा दिवसांपूर्वी सर्व्हेक्षण सुरू केले. एमएसआरडीसीचे अधिकारी अजय झा यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले. हा मार्ग काळबादेवी दर्यापासून किनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या बाजूने आरे-पुलापासून तीनशे मीटर आधी बाहेर पडणार आहे.