( नवी दिल्ली )
केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी २५ जानेवारी २०२५ ‘पद्म पुरस्कार -२०२५’ ची घोषणा केली आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिला जातो -१) पद्मविभूषण, २)पद्मभूषण आणि ३)पद्मश्री.
यामध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्यांना तिघांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
१)नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे – पद्मश्री पुरस्कार,
२) प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली- पद्मश्री पुरस्कार,
३) वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल – चैत्राम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मश्री पुरस्कारासाठी ३० नावांची घोषणा केली आहे. भीमसिंग भावेश, डॉ.नीरजा भाटला, ॲथलीट हरविंदर सिंग यांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. तर होमिओपॅथी चिकिस्तक असलेल्या डॉ. विलास डांगरे आणि वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
गोवा स्वातंत्र्य चळवळीच्या सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, मध्य प्रदेशातील उद्योजिका शैली होळकर, मराठी लेखक मारुती भुजंगराव चितमपल्ली यांना पद्मश्री देण्यात येणार आहे. दिल्लीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीरजा भाटला, सामाजिक कार्यकर्ते भीमसिंह भावेश, पुद्दुचेरी येथील थविल वादक पी. दत्चनमूर्ती, पश्चिम बंगालमधील धक वादक गोकुल चंद्र दास, कुवेतमधील योग शिक्षिका शेखा एजे अल सबा, उत्तराखंडमधील ट्रॅव्हल ब्लॉगर जोडपे ह्यूग आणि कॉलीन गँटझर, नागालँडमधील फळ उत्पादक एल हँगथिंग, भैरूसिंग चौहान, कादंबरीकार जगदीश जोशीला यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची यादी:
– एल हँगथिंग (नागालँड)
– हरिमन शर्मा (हिमाचल प्रदेश)
– जुमदे योमगम गमलिन (अरुणाचल प्रदेश)
– जोयनाचरण बाथरी (आसाम)
– नरेन गुरुंग (सिक्कीम)
– डॉ. विलास डांगरे (महाराष्ट्र)
– शेखा एजे अल सबाह (कुवैत)
– निर्मला देवी (बिहार)
– भीमसिंग भावेश (बिहार)
– राधा बहिन भट्ट (उत्तराखंड)
– सुरेश सोनी (गुजरात)
– पंडीराम मांडवी (छत्तीसगड)
– जोनास मॅसेट (ब्राझील)
– जगदीश जोशीला (मध्य प्रदेश)
– हरविंदर सिंग (हरियाणा)
– भैरूसिंग चौहान (मध्य प्रदेश)
– व्यंकप्पा अंबाजी सुगतेकर (कर्नाटक)
– पी दत्तनमूर्ती (पुडुचेरी)
– लिबिया लोबो सरदेसाई (गोवा)
– गोकुल चंद्र दास (पश्चिम बंगाल)
– ह्यू गँट्झर (उत्तराखंड)
– कॉलीन गँटझर (उत्तराखंड)
– डॉ. नीरजा भाटला (दिल्ली)
– सायली होळकर (मध्य प्रदेश)
– मारुती भुजंगराव चितमपल्ली (महाराष्ट्र)