( रत्नागिरी )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२३व्या भागानिमित्त रत्नागिरी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि कुस्तीपटू अनंत तापेकर यांचा सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या हस्ते तापेकर यांना मोगऱ्याचे रोप देऊन गौरविण्यात आले.
स्टेट बँक कॉलनीतील भाजपचे माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी यांच्या कार्यालयात रविवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमाला प्रभागातील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय मराठे, तुषार देसाई, संकेत चाळके, नितीन गांगण यांच्यासह भाजपचे अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आणि कुस्ती क्षेत्रातील परिचित नाव असलेले अनंत तापेकर यांचे समाजासाठी आणि पत्रकारितेतील योगदान याची उपस्थितांनी विशेष दखल घेतली. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमानंतर ‘मन की बात’चा सामूहिक श्रवण सत्र पार पडल्यानंतर विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चाही करण्यात आली. या सत्कार कार्यक्रमातून पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा आदर करण्याची भाजपची भूमिका अधोरेखित झाल्याचे चित्र होते.