(पुणे)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. गृह विभागाने ५० हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बदल्यांमध्ये पोलीस अधीक्षक (SP) आणि पोलीस उपायुक्त (DCP) दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, राज्यभरातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये नवे अधिकारी कार्यभार सांभाळणार आहेत.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कोल्हापूर, लातूर, गडचिरोली, भंडारा, अहमदनगर अशा विविध जिल्ह्यांमध्ये ही खांदेपालट झाली आहे. या बदल्यांमुळे पोलीस दलात नवीन ऊर्जा, कार्यक्षमता आणि प्रशासनिक स्थैर्य निर्माण होईल, असा विश्वास गृह विभागाने व्यक्त केला आहे.
प्रमुख बदल्या
-
लातूर – अमोल तांबे यांची लातूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती.
-
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (NCB) – निकेश खाटमोडे पाटील यांची या विभागातून अन्यत्र बदली.
-
पुणे – तेजस्विनी बाळासाहेब सातपुते यांची शस्त्र निरीक्षण शाखेतून रा. रा. पोलीस बल गट क्रमांक १ मध्ये समादेशक म्हणून नियुक्ती.
– अश्विनी सानप यांची लोहमार्ग पोलीस अधीक्षक, पुणे येथे नेमणूक. -
नवी मुंबई – संजय वाय. जाधव यांची रा. रा. पोलीस बल गट क्रमांक ११ मध्ये समादेशक म्हणून बदली.
-
मुंबई – शीतल झगडे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) मध्ये पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती.
-
भंडारा – निलेश मोरे यांची अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती.
-
अहमदनगर – वैभव कुलबुर्गे यांची अपर पोलीस अधीक्षकपदी नेमणूक.
-
गडचिरोली – गोकुळ राज जी यांची अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती.
या बदल्यांमुळे आगामी निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मदत होणार आहे. गृह विभागाने राज्यातील संवेदनशील आणि नक्षलग्रस्त भागात अनुभवी आणि सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विशेषतः ATS आणि गडचिरोलीसारख्या नक्षलप्रभावित क्षेत्रांत सुरक्षेचा बंदोबस्त अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.
बदल्यांचे आदेश तातडीने लागू करण्यात आले असून, सर्व अधिकारी त्वरित कार्यभार स्वीकारणार आहेत. या बदल्यांमुळे पोलीस यंत्रणेची सुसूत्रता वाढण्यासोबतच निवडणूक काळातील प्रशासन सुरळीत पार पाडण्यास मदत होईल, असा विश्वास गृह विभागाने व्यक्त केला आहे.