( रत्नागिरी )
रत्नागिरी जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक मा. नितीन बगाटे यांचे वंचित बहुजन आघाडी, तालुका रत्नागिरी यांच्या वतीने औपचारिक स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांचे योगदान मोलाचे ठरेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
या स्वागत कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, महासचिव बिपिन आयरे, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, यशवंत सावंत, वैभव यादव, सचिव देवदत्त कांबळे, विजय जाधव, सल्लागार अजित जाधव, महिला आघाडी अध्यक्ष वीरश्री बेटकर मॅडम, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत कांबळे, तसेच रत्नदीप कांबळे, गायकवाड , आणि रंजना गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी नितीन बगाटे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व घटकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी जिल्ह्यातील विविध सामाजिक, प्रशासकीय आणि सुरक्षाविषयक बाबींवरही सकारात्मक संवाद साधला.