(जाकादेवी / संतोष पवार)
बुद्धवाद आणि मार्क्सवाद यांच्या विचार सरणीमद्ये तुलना केली तर खूप मोठा फरक असल्याचे समजून येतो. मार्क्स वाद काय आहे हे आपल्याला, सर्वसमान्यना अजूनतरी कळलेला नाही. बुद्ध व मार्क्सवाद समजून घेऊन त्या मागील कार्यकारणभाव डॉ. आंबेडकरी जनतेने समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. बुद्ध आणि आंबेडकरी विचारसरणीची माणसे ही चिकित्सक, अभ्यासू असून प्रज्ञा, शील, सम्यक मार्गाने चालणारी आहेत. म्हणूनच प्रज्ञा, शील, चिकित्सक आणि सम्यक विचाराने चालणारा माणूस हा जगात सक्षमपणे यशस्वी होतो आहे, असा ठाम विश्वास जेएनयु युनिव्हर्सिटीचे जिज्ञासू विद्यार्थी, विचारवंत प्रा. डॉ. वृत्तांत मानवटकर यांनी रत्नागिरी येथे व्यक्त केला.
युवा परिषद रत्नागिरी यांच्यावतीने रत्नागिरी खेडशी, एकदंत नगर, विपश्यना केंद्र येथे आयोजित केलेल्या एकदिवशीय युवा परिषदेत बुद्धा की, कार्ल मार्क्स..? या विषयावर प्रमुख मार्गदर्शक करताना प्रा. डॉ. वृत्तांत मानवटकर बोलत होते. याप्रसंगी परिषदेच्या विचार मंचावर रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, निवृत्त गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, विपश्यना केंद्र पालीचे संतोष आयरे, संजय आयरे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संजय कांबळे, प्राध्यापक रविचंद्र कांबळे, विजय मोहिते सत्यशीला पवार, माजी उपनिबंधक रत्नागिरीचे गौतम कांबळे, प्रा.विशाखा पावसकर , नंदकुमार यादव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना, पंचशीलाने करण्यात आली. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन तर परिषदेत उपस्थित राहिलेल्या सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी पुढे बोलताना प्रा. डॉ. वृत्तांत मानवटकर यांनी जेएनयु युनिव्हर्सिटी दिल्ली येथील विविध अभ्यासक्रम, पद्धती, विद्यापीठातून तयार होणारे नेतृत्व आणि तेथील आंबेडकरी चळवळीबाबत उपस्थित युवा वर्गाला सविस्तर माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, सद्याची राजकीय, समाजिक, धार्मिक परिस्थिती पाहता डॉ. आंबेडकरी चळवळीला एक प्रकारे डायवर्ड करण्याची सुप्त पद्धत अज्ञात शक्तीकडून सुरू आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेने सजग रहायला हवे, अशी अनेक ज्वलंत सोदाहरण देत उपस्थित युवा व वयोवृद्ध नागरिकांच्या प्रश्नांचे निरसन केले. बुद्धवाद आणि मार्क्सवाद ही दोन विचारसरणी स्पष्टपणे समजावून सांगितली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा परिषद रत्नागिरीचे युवा नेतृत्व निहाल हातखंबेकर, विनोद पात्रोट, संदेश कांबळे, सौरभ आयरे, कल्पेश हातखंबेकर अन्य सदस्यांनी मेहनत घेतली. युवा परिषदेत जिल्ह्यातील जाणकार व्यासंगी व्यक्तिमत्व, युवा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.