(रत्नागिरी)
शहरातील सन्मित्रनगर परिसरात वर्षभरापूर्वी घडलेल्या दागिने चोरीप्रकरणी एक पुरुष आणि एका महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात अखेर ६ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महेश दगडू गुरव (वय ४९, रा. बालाजी स्काय चॅलेट, जेल रोड, रत्नागिरी) यांच्या घरात शिरून कपाटातील सुमारे २ लाख २० हजारांचे मंगळसूत्र आणि ४५ हजारांची सोनसाखळी, असा एकूण २ लाख ६५ हजारांचा सोन्याचा ऐवज दोघांनी लंपास केल्याची तक्रार आहे.
या प्रकरणी बाळ क्षीरसागर आणि एका महिलेला (दोघेही रा. अमृतसृष्टी, सन्मित्रनगर, रत्नागिरी) संशयित म्हणून नामजद करण्यात आले आहे. चोरीची घटना १६ मे २०२४पूर्वी घडली होती. संबंधित घटनेचा तपास सुरू असून, पुढील चौकशीसाठी पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला आहे.