(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात शनिवारी 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कवी केशवसूत स्मारकातील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयामध्ये या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जयंतीनिमित्ताने ग्रंथालयामध्ये ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले.
या ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन ग्रंथालय समितीचे कोषाध्यक्ष रवींद्र कृ. मेहेंदळे व कोमसाप शाखा – मालगुंडचे सचिव विलास राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.. यावेळी नागपूर येथील साहित्यिका मा. श्रीमती मीनाक्षी मोहरील यांची उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान धाडसी कार्याबद्दल उपस्थिताना बहुमोल मार्गदर्शन केले या ग्रंथ प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी ग्रंथालय समितीचे प्रमुख पदाधिकारी, ग्रंथालय कर्मचारी, वाचक व पर्यटक उपस्थित होते.