(साखरपा / भरत माने)
भारतीय नाविक सेना युनियन रौप्य (२५व्या) वर्धापन दिनाचे औचित्य साधून समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट मुंबई या ठिकाणी पार पडणार आहे. 6 जून शुक्रवार सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी आकर्षक असा मनोरंजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
तसेच या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून बी. एस. टीका, कॅ. नरेन भट्ट, कॅ. के. एस. पेंटल,कॅ. दिपक कुरिया, कॅ.संजय भावनानी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मागील 25 वर्षे भारतीय नाविक सेना युनियनने आपल्या कार्याचा ठसा उमठवीला आहे. या क्षेत्रातील अनेक समस्यांचे निराकारण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच अनेकांना न्याय देण्याचे काम संस्थेने केले आहे. विशेष म्हणजे जे नवोदित तरुण आहेत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर संस्थेने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक गरजूना मदत केली आहे.
दरवर्षी संस्थेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप विविध विद्यालयातून करण्यात येते. अशाप्रकारचे विविध उपक्रम संस्था राबवते. यंदाचे 25 वे दैदीप्यमान वर्ष म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष रवींद्र बाईंग, जनरल सेक्रेटरी सुरेश साळस्कर, सेक्रेटरी नंदकुमार बाईंग मेहनत घेत आहेत.